Friday, February 27, 2009

हसलो म्हणजे

'हसलो' म्हणजे 'सुखात आहे' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे 'दुखले नव्हते' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही ! ...

'हसलो' म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
'हसलो' कारण शक्यच नव्हते दुसरे काही
'डोळ्यामध्ये पाणी नव्हते' ऐसे नाही !

'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

'हसलो' कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
'हसलो' कारण तुला सुद्धा ते खरे वाटते !
'हसलो' म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
'आतुन आलो होतो डवरून ऐसे नाही..

'हसलो' कारण शास्त्राची मज ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
'हसलो' कारण हिशोबास या दमलो नाही
'हसलो' कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

'हसलो' कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
'हसलो' कारण सत्याची मज भीती नाही
'हसलो' कारण फसण्याच धसका नाही . .

- नेणिवांची अक्षरे, संदीप खरे

Wednesday, February 25, 2009

धुंद होते शब्द सारे...

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या


गीत: कौस्तुभ सावरकर
चित्रपट : उत्तरायण
गायक : रविन्द्र साठे, रविन्द्र बिजूर, बेला
संगीत : अमरत्य राउत
.

Tuesday, February 24, 2009

इंदिरा संत हे नाव नुसतं आठवलं तरी एक अगदी शांत सोज्वळ कविवृत्ती साकार सामोरी येते. त्यांनी अगदी मोजकंच गद्य लिखाण केलं. पण ते गद्य हे ही एक काव्यच! त्यांच्या 'मृद्गंध' या लेख संग्रहातल्या 'अरसिक किती हा शेला ' या लेखातला उतारा : निसर्गाच असं शब्दचित्र क्वचितच कुणी चितारू शकेल. .
------------------------------­------------------------------­-----

वादळासकट गारांचा पहिला वळीव कोसळून जावा। मग त्याच्या दुसर्या दिवशी सृष्टीने जो नजराणा पुढे केलेला असतो तो बघत रहावा. दरवर्षी मी त्या दिवसाची वाट पाहात असते. त्या दिवसाचा सूर्य उगवतो तोच किती निराळा! सूर्य चांगला वर आलेला असतो. तरी तो लाल पिवळा असा, उगवत्या पूर्ण चंद्रासारखा आभाळात स्निग्धपणे तरंगत असतो. सभोवती लालसर धुक्याचे वलय असणारा आणिचांगले उजाडल्यावरही असा प्रसन्न रंगमूर्ती दिसणारा सूर्य त्याच दिवशी पहायला मिळतो.
दूर आकाशाला टेकलेला यळ्ळूर गडही जमिनीसरशी तिरपे पंख पसरून पाठमोर्या बसलेल्या राखी पक्ष्यासारखा दिसतो, आणि त्याच्या पायथ्याशी जी झाडांची लांबलचक पसरलेली गर्दी असते. तीत शुभ्र अशा सावरीच्या कापसासारखे धुके घनदाट भरुन असते. शुक्याचा तो शुभ्र लांबलचक पट्टा आणि त्यात माने-कपाळापर्यंत बुडुन गेलेली झाडे, पलीकडे मधूनच चमकणारा विजेच्या तारांचा जुडगा ... ध्यानी मनी नसताच नकळत एक ओवी ओठांवर येते.
"भरली चंद्रभागा,
झाडं बुडाली लहान थोर
सव्वालाखाचा पीतांबर,
जनी धुईते पायावर ..."
जनी दिसत नव्हती, पण चंद्रभागा दिसत होती, बुडालेली झाडेझुडे दिसत होती. आणि त्या बहुमोल पीतांबरावरील जर चमचमत होती. मग विटेवर उभे राहून जनीची निर्व्याज भक्ती बघणारा तो विठू, म्हणजे इथे काशात कोमलाहून कोमल होऊन ते नवल पाहत राहिलेला हा सूर्य तर नसेल?
पण या मनोहारी चित्रापेक्षाही, वातावरणातील झिरिमिरी धुक्याला किती बघावे असे मला झाले. माझ्या श्वासाला जाणवणारे आणि खिडकीपासून त्या चंद्रभागेपर्यंत जे धुके लहरत होते त्याची शोभा कशी वर्णन करणार? समोरच्या इमारती, माळावरून जाणारी माणसे, शेळ्या, शेतातील कुणी चालवत असलेली कुरी, शिवारातील झोपडे ... या सर्वांवर जाळीदार मोहिनी पसरणारे ते तरळ विरळ धुके हाच या दिवसाचा सृष्टीने पुढे केलेला नाजूक नजराणा होता. हे धुके कसले? झिरझिरित अशी अती तलम ओढणीच. आणि मनात आले, सकाळी सकाळी शेजघरातून बाहेर येऊन वावरणारी नववधू जशी पापण्या खाली वळवून, नणंदा-जावाच्या रोखलेल्या गमतीदार नजरा टाळते आणि ओठावरची लाली आणि डोळ्यांतील चमक दिसू नये म्हणून घुंघट पुढे ओढून घरभर लगबगीने फिरते ... तशी ही सृष्टी, अवगुंठनवती.
महावस्त्राचा एक पदत बोटांनी धरून उचलून घडी उलगडावी तसे आता होते. समोर हे जाळीदार मनोहारी दृश्य दिसत असताना, मनात निराळेच धुके दिसू लागते. आमच्या घुमटमाळावरील रस्त्यावर मी हिवाळाभर बघत असलेले. वाहत्या नदीत शुभ्र वस्त्र पसरावे आणि ते प्रवाहावरोबर पसरत असताना त्यावर वलयांच्या चुण्या उमटत याव्यात, तसे समोरुन, आजूबाजूंनी पायाशी रांगत लहरत लाटालाटांनी येणारे धुके. शेजारच्या शेतावरुन फेनिल लहरींसारखे वार्यावर झुलत येणारे धुके. ते दुरुन येऊन एकदा पायांवरुन जाईपर्यंत पाऊलच पुढे उचलता येत नाही. वाटते, थोडे मुठीत धरुन ठेवावे. पण मिळत नाही..


संग्रह: मृद्गंध
लेख: अरसिक किती हा शेला....
लेखिका: इंदिरा संत.

Friday, February 20, 2009

एकदा केंव्हा तरी

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,
आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥


-मंगेश पाडगांवकर

Thursday, February 19, 2009

आज या मैफ़ीलीत

आज या मैफ़ीलीत
काय मजा आली..
त्या एकटया चंद्राला पाहुन
चांदणी गालात हसुनी म्हणाली…

आली आहे मी इथे
तो साज चंदेरी घालुनी
आता डोळे भरुनी
तु घे मला पाहुनी..

मग घेतली त्या वेड्या चंद्राने
नजर आपली रोखुनी..
पुटपुटला तो ओठातल्या ओठात
“नाही पाहीले असे अप्रतिम सौंदर्य अजुनी !”

घायाळ झाली ती
अन लाजली ते ऎकुनी..
पुसले तीने त्याला आवर्जुन
कुठे होतास तु माझी मैफ़ील सोडुनी…

मग केला आवाज तीने
त्या छुमछुम पैणजनाचा..
इकडे वाढला होता
ठोका चंद्राच्या काळजाचा..

केली तीने सुरु
उधळण त्या सप्तसुरांची..
जाहली प्रेमळ दशा
त्या चंद्रच्या हळव्या मनाची

थिरकत होते पाय तीचे
घुमत होते नाद स्वरांचे
मग मत्रंमुग्ध जाहले होते
कान त्या चंद्राचे..

आता पेटला होते सार आसमंत
झाल्या सज्ज नर्तिका स्वर्गाच्या
न्हाउनी रंगात प्रकाश्याच्या
उजळला होते रंग मैफ़ीलीचा.

सारे विलीन होत होते..
तारेहि दिशाहीन होत होते..
आता जणु त्या मैफ़िलीने
सारयांना भाव वश केले होते..

मग मैफिलिचा रंग
मावळतीकडे अचानक वळाला..
होतच असे सारयांच्या डॊळ्यातुनी
थेंब अश्रुंचा गालावरुनी ओघळला

कारण असे काय घडले होते
त्या भावुक मैफिलित.
चक्क चंद्रच हरवला होते
त्या चांदणीच्या कुशीत

म्हणुनच कदाचीत
आजही जातो चंद्र त्या मैफिलिला
कारण नजरेस येत नाही
तो अमावसेच्या रातीला

एवढे असुनही
पोर्णिमेच्या रातीला तो एकटा असतो
चांदण्याची मैफिल मात्र
कायमचाच तर खेळ असतो…॥

-अनामिक

नेणिवेची अक्षरे

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त
ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात
चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात....

तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते!
ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा
हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा.........

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति
प्रेम नाही, हवी असते मला चवथी मिति!

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वथाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखल पश्चाताप!

- संदीप खरे ( नेणिवेची अक्षरे).

Wednesday, February 18, 2009

कसे सरतिल सये

कसे सरतिल सये मझ्याविना दिस तुझे सरताना आणि सांग सलतिल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुजे उरे
ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा आळीमीळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना
गुलाबाची फूल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसूम
चिडिचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलचं आणि पुन्हा छळेलचं
नभातुन गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आसवांचे ओले सण
रोज रोज निजभर भरतिल ना
गुलाबाची फूल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर काचभर तडा
तूच तूच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा
पड़े माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ..

आता नाही बोलायचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देह्भर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले
जरा घन झरू देना वारा गुदमरुदेना
तेव्हा नभ धरा सारी भिजविल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल न भरतिल ना ॥

-संदीप खरे.

Tuesday, February 17, 2009

ससा तो ससा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले
वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा

वेडं मन

वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….

कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…

कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…

कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…

कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….

कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट

कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा

एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं

असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना…

Monday, February 16, 2009

तु असशीलही कदाचीत नसशीलही

तु असशीलही कदाचीत नसशीलही ..
एक ओळ असावी मात्र, तुझ्यासोबत लिहिलेली
कधीतरी नकोसं झाल की
खोल कुशीत घेणारी..

तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक श्वास असावा फक्त, तुझ्यासोबत घेतलेला
माझा बंद पडला तर
काळजामधुन वाहणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

एक स्पर्श असावा तुझा फक्त, हळुवार हातांचा
जगाने दिलेल्या जखमांवरुन
मलम होऊन फिरणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

एक दाद असावी तुझी फक्त, माझ्या कवितेला दिलेली
शब्दच सुचणार नाहीत तेव्हां
नवी आशा देणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

पण आतुन एक हाक मात्र कायम असेन तुझी
काळीज चिरुन टाकणारा विरह असेनच तुझा
आणि त्या घावानंतरही
तुझ्यासाठी वाहणारी वेदना असेन..
तितकीच जिवंत आणी ताजी.. तुझ्या स्पर्शासारखी
आणी मागे असेन मी, पण तेव्हा
तु असशीलही कदाचीत नसशीलही

- अनामिक

Thursday, February 12, 2009

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


************ ********* *********

तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला. त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....

तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....
आता तू सांग कशी जगशील??
हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?
खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?
कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?

एकाकीपण जेव्हा खायला येईल,
निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,
गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....
तेव्हा सांग कोणाला बिलगशील??

गप्पांचा ओघ ओसरू लागताच..
तू नकळत काही बोलून जाताच...
सांग स्वत:ला कशी आवरशील?
जखमी मनाला कशी सावरशील?

चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रू पाघळशील...
एकटीच स्फ़ुंदत बसशील..
किती वेळ तरी....

मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......
तू हळवी होशील...रडशील.
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील.

माझी जाणीव हवा तुला करून देईल,
माझा भास छाया तुला करून देईल,
पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,
माझा आभास श्वास तुला करून देईल,

लक्श कुठेही लागणार नाही,
चंचल चित्त स्थिरावणार नाही
स्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,
मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,
तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,
तू असेच दिवस रेटत जाशील...
सांग काय करशील?

तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........
आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

-अनामिक

Monday, February 9, 2009

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी

तू तेव्हा तशी...
तू तेव्हा अशी...


तू माझ्या आयुष्याची पहाट॥
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..

-सुरेश भट.

Friday, February 6, 2009

आल्या आल्या म्हणतेस

आल्या आल्या म्हणतेस
आता
पुन्हा कधी जाणार नाही

जाता जाता म्हणतेस
आता
पुन्हा कधी येणार नाही

येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं ?
वा-यावरती तरंगणारी
सारीच पिसं

नसतानाही भरपूर असतेस
एवढं तुला कळणार नाही॥


-कुसुमाग्रज

Wednesday, February 4, 2009

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी
आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे..
ओथंबल्या क्षणांचे
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..
रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात
फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..
पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी
अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..

गीत: अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : तेजोमय नादब्रम्ह

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

Monday, February 2, 2009

चाफ्याच्या झाडा..

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

- पद्मा गोळे.