Showing posts with label सुरेश भट. Show all posts
Showing posts with label सुरेश भट. Show all posts

Tuesday, June 19, 2012

मराठ्या उचल तुझी तलवार

"मराठ्या"
मराठ्या उचल तुझी तलवार
एकिची उचल तुझी तलवार
शपथ तुलाआइच्या दुधाची
घेउ नको माघार, मराठ्या....
शपथ तुलाशिवछत्रपतींची
चळचळ कापत अवनी सारी
काय विसरली दिल्ली तुझिया
तलवारीची धार, मराठ्या....
दाहिदिशांना तुडवित होत्या
तुझ्याच घोड्यांच्या रे टापा
अवघा भारत पहात होती
गड्यातुझा वाघासम छापा
तुझी जात मर्दाची मर्दा
कर शेवटचा वार, मराठ्या....
आता दाखव तराजूस तू
अपुल्या तलवारीचे पाणी
सांग विकत का घेतिल तुजला
बनियाच्या थैलितिल नाणी
भीक कशाला घे हक्काने
तुझेच तू भांडार, मराठ्या.....
कमनशिबाने तुझे पुढारी
बाजिराव पळपुटे निघाले
नव्याच बाळाजीपंताने
निशाण चोरांचे फडकवले
अशा पिसाळा उडवाया कर
ऐक्याचा निर्धार, मराठ्या.....
स्वर्गामधल्या पुण्यात्माचे
तुजवर मर्दा खिळले डोळे
आणिक टपून बसले दुष्मन
तुझे पुरे करण्या वाटोळे
जिंकलास तर अखिल विश्व तव
करील जयजयकार, मराठ्या.....
सुरेश भट
. बाजीराव दुसरा. ह्याने शनिवारवाड्यावर युनियन जॅकचे निशाण फडकावले
. बाळाजीपंत नातू.
. सूर्याजी पिसाळ. मराठ्यांचा फितूर सरदार.
 ---
आचार्य अत्रे यांच्या 'दैनिक मराठा'च्या पहिल्या अंकात (१५ नोव्हेंबर १९५६) मुखपृष्ठावर माझा भाऊ सुरेश ह्याची 'मराठ्या उचल तुझी तलवार' ही कविता छापण्यात आली होती. तेव्हा तो २४ वर्षाचा होता. 'दैनिक मराठा' हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत 'दैनिक मराठी'चा फार मोठा सहभाग होता. 'कऱहेचे पाणी' या आपल्या आत्मचरित्रात वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे. ही कविता मला शिरीष पै ह्यांचेकडेही मिळाली नाही. हे गीत श्री. मधुकर झेंडे, ग्रंथपाल, सावर्जनिक वाचनालय, नासिक ह्यांनी प्रेमाने पाठवले.
दिलीप श्रीधर भट

आकाश उजळले होते

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

    
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
     मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.

    
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
     मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.

    
याचेच रडू आले की जमले मला रडणेही
     मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

     मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
     मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.
सुरेश भट

मग माझा जीव...

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील,दर्पणात पाहशील,माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

                    
-सुरेश भट

उशीर

हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!
आला गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..सारे उगाळलेले ते कोळसेच होते!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!
होती ती दयाही.. ती जाहिरात होती!जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.मातीत पावलांचे काही ठसेच होते!
-सुरेश  भट

Saturday, November 6, 2010

राहिले रे अजून श्वास किती

राहिले रे अजून श्वास किती जीवना,ही तुझी मिजास किती
आजची रात्र खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती ?
मी कसे शब्द थोपवू माझे?हिंडती सूर आसपास किती
दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?
ओळखीचे कुणीतरी गेले..ओळखीचा इथे सुवास किती
हे कसे प्रेम? या कशा आशा?मी जपावे अजून भास किती?
सोबतीला जरी तुझी छाया..मी करू पांगळा प्रवास किती
-सुरेश भट